30/03/2026
#कोकणातील शेतकऱ्यांना, या महागाईच्या पुढील काळात, टिकायचे असेल तर, त्यांच्यासमोर, सामूहिक शेती, हाच एक उत्तम पर्याय आहे. सामूहिक शेती केली, तरच, पुढील काळात, कोकणातील शेतकरी, टिकून राहू शकतो.
तसेच गटशेती करताना, कोकणातील शेतकऱ्यांनी, पारंपरिक शेतीला फाटा देऊन, शेतीमध्ये, आधुनिक यंत्र सामग्री आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून, शेती केली पाहिजे.
ते कसे करावे? आणि त्यासाठी, सुरवातीला काय केले पाहिजे.त्याबद्दल हा सविस्तर लेख वाचा......
#गटशेती प्रारंभ.....
तर, सुरवातीला, कोकणातील प्रत्येक गावच्या वाडीतील, दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, एक सामूहिक शेतकरी गट स्थापन केला पाहिजे. त्या स्थापन केलेल्या, शेतकरी गटाची, रीतसर शासनाकडील कृषि विभागाकडे नोंदणी (रजिस्टर) करून घेतली पाहिजे. म्हणजे शासनाकडे रीतसर नोंदणी केल्यामुळे, शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा, त्या गटाला लाभ घेता येतो.
#सामूहिक (गटशेती) शेती आणि त्याचे फायदे खालील प्रमाणे......
१) सामूहिक शेतीगट शासनाकडे रजिस्टर केल्यामुळे, शासनाकडुन त्या गटाला, शेती अवजारे, आधुनिक यंत्र सामग्री घेण्यासाठी, अल्प व्याज दराने कर्ज मिळते. तसेच आधुनिक शेती अवजारे घेण्यासाठी, सरकारकडून पन्नास टक्के किंवा शंभर टक्के अनुदान मिळते. तसेच #नाबार्ड ही संस्था ही, त्या गटशेती गटाला, कमी व्याजदरात, शेतीसाठी कर्ज पुरवठा करते.
२) तसेच सामूहिक शेती करणाऱ्यांना, #व्हीबीजी #ऍग्रो फर्मचे मा.श्री. हणमंतराव गायकवाड साहेब किंवा #सह्याद्री #ऍग्रो फर्मचे ज्ञानेश्वर बोडके साहेब, यांच्यासारख्या, खाजगी संस्थांकडून ही, शेतकऱ्यांना गटशेती करण्यासाठी, मदत केली जाते.
३) तसेच सामुहिक शेती केल्यामुळे, श्री हणमंतराव गायकवाड साहेब, श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब किंवा मोठा व्यापारी, स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन, आपला शेतमाल, घाऊक दराने खरेदी करतात.
४) आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे, गावात फक्त एका शेतकऱ्याने शेती केली तर, वन्य प्राणी येऊन त्या शेताचे संपूर्ण नुकसान करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. आणि शेवटी तो शेतकरी कर्ज बाजारी होऊन, शेती करायचे सोडून देतो.
परंतु सामुहिक शेतीचे, वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर ते, सर्वांचे एकत्रित नुकसान होते, त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आर्थिक भार, त्या शेतकरी गटातील, प्रत्येक शेतकऱ्याला थोड्या प्रमाणात, सोसावा लागतो. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला सोसावा लागत नाही.
टिपः फळबाग व व्यवसायिक शेती करण्यासाठी, बारमाही कोकणातील सर्व नद्यांना मुबलक प्रमाणात पाणी,हाच कोकणच्या आर्थिक विकासाचा, खरा राजमार्ग आहे.
धन्यवाद.

12/02/2026