06/01/2026
*बालेवाडी-बाणेर च्या टँकर सम्राटांशी लढणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर*
मराठवाड्यातून शिकून करियर साठी पुण्यात आलेल्या तरुणांमधलाच एक - सुदर्शन !
पर्सिस्टंन्स सारख्या कंपनीत नोकरी लागली आणि पुढे इंग्लंड वगैरे ला ऑनसाईट जाऊन कमावलेल्या पैश्यात कर्जाची भर टाकून "स्मार्ट सिटी " अशी जाहिरात झालेल्या बाणेर-बालेवाडी भागात त्याने फ्लॅट घेतला ..
आणि राहायला आल्यावर समजले कि दरवर्षी १५,००० प्रॉपर्टी टॅक्स पुणे महापालिकेला द्यायचा आहे आणि पाणी मात्र टँकर ने विकत घ्यायचे आहे. हा सरळ सरळ अन्याय होता.
मग कोणत्याही जागरूक नागरिकाप्रमाणे त्याने मनपा मध्ये निवेदन दिले ...पण पुढे काहीच झाले नाही ... मग पुन्हा निवेदन दिले ... या followup ला मनपा च्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन त्याची बोळवण केली. आणि मग संतापलेल्या सुदर्शन चा लढा सुरु झाला ! "इन्फ्रास्ट्रक्चर चा विचार न करता बिल्डरला हव्या तश्या परवानग्या देणारे प्रशासन आणि लोकांची असुविधा हि पैसे कमवायची संधी समजणाऱ्या टँकर सम्राट " यांच्या विरोधात !! रजा घेऊन तो पालिकेत जायचा , बिल्डरकडे जायचा , वॉटर डिपार्टमेंट ला जायचा .. पेड लीव्ह्ज संपल्या त्यानंतर अनपेड लीव्ह्ज घेऊन त्याचे कार्य सुरु राहिले. अनेक संकटाना, धमक्यांना न घाबरता सामोरे जात त्याने लढा सुरु ठेवला . आणि ५ वर्षांच्या प्रयत्नानंतर शेवटी तो जिंकलाच ! त्याच्या प्रयत्नांमुळे बालेवाडीतील अनेक सोसायट्यांना पाणी मिळाले..
मात्र अजूनही त्याचा लढा सुरूच आहे कारण अजूनही बालेवाडी , बाणेर , सुस , म्हाळुंगे, पाषाण , सुतारवाडी या भागात टँकर नेच पाणीपुरवठा सुरु आहे. आणि "पाणी हि जीवनावश्यक गरज नागरिकांना पुरवणे हे मनपा चे कर्तव्य आहे" हा त्याचा ठाम विश्वास आहे.
हि लढाई लढताना त्याला प्रशासनाची कर्तव्ये , नागरिकांचे हक्क या सगळ्यांचा पाच वर्ष खूप अभ्यास झाला. आपण नेहमी म्हणतो ना "सुशिक्षित व लढाऊ लोकप्रतिनिधी प्रशासनात असावेत!" . तोच सुदर्शन आज नगरसेवक पदासाठी निवडणुकीस उभा आहे, प्रभाग क्रमांक ९ ड मधून..
कोणताही राजकीय सपोर्ट नसताना सिस्टीमशी लढणाऱ्या सुदर्शन सारख्या माणसांची आज समाजाला गरज आहे. अशी माणसे महापालिकेत गेली तर आपले प्रश्न अधिक नेटाने मांडतील.
सुदर्शन निवडणुकीस उभा असला तरीही त्याचे तुम्हाला ना बॅनर्स दिसतील , ना डीजे च्या गजरातला प्रचार !! कारण "अनधिकृत बॅनर लावून तसेच लोकांच्या आरोग्याचा विचार न करता डीजे च्या दणदणाटात प्रचार करणारे उमेदवार " हे निवडणूक लढवतानाच जनतेचा विचार करत नाहीत तर निवडून आल्यावर कसा करतील ! हे त्याचे स्पष्ट मत आहे. त्याचा अभ्यास आणि त्याची प्रश्नांची जाण हि शिदोरी घेऊन तो लोकांना भेटतोय.
तुम्हा आम्हा सर्वाना वाटतं कि "सिस्टीम बदलायला हवी " ,या मात्र प्रॅक्टिकल कारणानी आपल्याला ते जमत नाही. म्हणून मग आपल्याला 'आपल्यासाठीच लढणारा आपल्यातलाच उमेदवार' निवडायला हवा आणि त्याला बळ द्यायला हवं. असा उमेदवार जो २ BHK फ्लॅट मध्ये राहतो, ज्याला ट्राफिक चा प्रश्न सोडवायचा आहे , ज्याला रात्री बेरात्री फटाके उडवून वाढदिवस साजरा करणाऱ्या गुंडांचा त्रास होतो , ज्याला गरज नसताना रस्ते खणून उगीच त्याचे काम काढले तर राग येतो , ज्याला दिसते कि 'बिल्डिंग बांधायला लगेच जमीन मिळते पण रस्ते बांधायला जमीन अधिग्रहण होत नाही ' , ज्याला हे सर्व प्रश्न प्रशासनाला विचारायचे आहेत !! तुमच्या माझ्यासारखाच !!
प्रभाग क्रमांक 9 ड, सुस बाणेर पाषाण
अ. क्र. २ सुदर्शन नाशिकराव जगदाळे

15/11/2025
15/11/2025
25/10/2025